TRENDING:

मुंबई, ठाण्याला विळखा! भारतात पसरत असलेला कोरोना किती खतरनाक? डॉक्टरांनीच सांगितलं

Last Updated:

Coronavirus Cases In India : भारतात, विशेषतः मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. डॉक्टर खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. देशातील बहुतेक संसर्गाची प्रकरणे मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आढळली आहेत. भारतात पुन्हा हाहाकार माजवणारा हा कोरोना किती खतरनाक आहे? याबाबत डॉक्टरांनीच माहिती दिली आहे.
News18
News18
advertisement

आशियाई देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही आठवड्यात हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड आणि आता भारतातही रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आशियाई देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, परंतु त्यात निश्चितच थोडी वाढ झाली आहे. भारतात कोविडचे 257 हून अधिक रुग्ण आहेत.

भारतात पसरणारा कोरोना किती खतरनाक?

लोकांमध्ये डोकेदुखी, घसा खवखवणे, ताप, सर्दी, पोटदुखी किंवा लूज मोशन यासारख्या समस्या दिसून येत आहेत. सध्या याला फक्त सौम्य संसर्ग म्हणून पाहिलं जात आहे. या संसर्गाने ग्रस्त रुग्ण अवघ्या चार दिवसांत बरे होत आहेत.

advertisement

Coronavirus : कोरोनाने घेतलं रौद्ररूप! मुंबईत 3 बळी, एकाच महिन्यात रुग्णसंख्या 150 पार, ठाण्यातही कहर

डॉक्टरांच्या मते, हा ओमिक्रॉन विषाणूचा एक प्रकार आहे. नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयातील चेस्ट मेडिसीनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. उज्ज्वल पारख म्हणतात की, हा एक आजार आहे जो दीर्घ कालावधीनंतर परत येतो. या प्रकरणात नवीन प्रकार उदयास येताच संसर्ग पुन्हा दिसू लागतो. कोविड-19 हा आजार दीर्घ कालावधीने परत येत राहील, ज्यामध्ये उत्परिवर्तन देखील होतील, म्हणजेच तो अनेक महिने कमी न होता वेगाने पसरत राहू शकतो. यामुळे आपल्याला प्रकरणांच्या संख्येत वाढ दिसून येते. त्यामुळे याबद्दल जास्त विचार करण्यासारखे काही नाही.

advertisement

हा ओमिक्रॉन विषाणूचा एक प्रकार आहे. त्याची लक्षणं अगदी सोपी आहेत. जास्त घाबरण्याची गरज नाही. पण शेजारील देशांमध्ये वाढत्या प्रकरणांमुळे भारतातील डॉक्टर सतर्क आहेत. आम्ही सतत येणाऱ्या प्रकरणांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून वेळेत आवश्यक पावले उचलता येतील, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

कोरोना टाळण्यासाठी काय करावं?

कोरोनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काही खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

advertisement

जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर नक्कीच मास्क घाला.

Health Risk Of The Day : फळं खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्याने काय होतं?

खोकताना किंवा शिंकताना तुमचं तोंड आणि नाक रुमाल किंवा कोपराने झाका जेणेकरून विषाणू इतरांपर्यंत पोहोचू नये.

साबण आणि पाण्याने हात चांगले धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.

जर तुम्हाला ताप, खोकला किंवा घसा खवखवणं यासारखी लक्षणं जाणवत असतील तर घरीच रहा आणि गरज पडल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुंबई, ठाण्याला विळखा! भारतात पसरत असलेला कोरोना किती खतरनाक? डॉक्टरांनीच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल