जिमला जाऊन घाम गाळला की वजन खरंच कमी होतं का ? जिम सुरु केल्यावर काही दिवसांनी वजन केलं की, वजन काट्यावरचा आकडा काही बदललेला नसतो, जुना आकडा दिसल्यानं नैराश्य येऊ शकतं. पण प्रश्न असा आहे की, इतके प्रयत्न केले जात असतील तर वजन का कमी होत नाही?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, वजन कमी करणं हे फक्त जिममधे घाम गाळण्यानं होत नाही. कारण ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, अनेक शारीरिक सवयी आणि विविध घटकांचा समावेश असतो.
advertisement
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपलं वजन हे आपण दिवसभरात किती कॅलरीज वापरतो आणि किती कॅलरीज खर्च करतो यावर अवलंबून असतं. ऊर्जेचं सेवन आणि उर्जेचा वापर यात संतुलन नसेल तर वजन कमी होण्याची गती कमी होऊ शकते.
Acid Reflux : सीने मे जलन ? चिंता करु नका, या सोप्या उपायांनी नक्की पडेल फरक
जिममधे एक तास जास्त कॅलरीज बर्न करतात, पण प्रत्यक्षात नेहमीच असं नसतं. शरीर व्यायामादरम्यान खर्च झालेल्या उर्जेची भरपाई इतर मार्गांनी करतं.
व्यायाम करणं आवश्यक आहे - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्यायाम करणं आवश्यक आहे, पण यासाठी, योग्य पद्धत आणि संतुलन समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वजन उचलण्याच्या व्यायामानं स्नायू तयार करण्यासाठी मदत होते. स्नायूंचं प्रमाण वाढतं तेव्हा शरीराची चयापचय प्रक्रिया वेगवान होते. विश्रांतीच्या वेळीही शरीर जास्त कॅलरीज बर्न करतं. म्हणूनच, फिटनेस रूटीनमधे केवळ कार्डिओ व्यायामच नाही तर स्ट्रेंथ ट्रेनिंगचाही समावेश करणं महत्त्वाचं आहे.
आहार - वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहार महत्वाचा आहे. निरोगी खाल्लं तर त्यांचं वजन आपोआप कमी होईल, परंतु ही एक छोटीशी चूक आहे. काही वेळा हेल्दी फूड देखील जास्त प्रमाणात खाल्लं तर त्यांच्या कॅलरीज जास्त असल्यानं वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते.
उदाहरणार्थ, काजू, तूप, एवोकॅडो, स्मूदी आणि सुकामेवा यांसारखे अनेक पदार्थ निरोगी म्हणजे हेल्दी मानले जातात, परंतु त्यात कॅलरीज देखील जास्त असतात. जास्त प्रमाणात खाल्ल्यानं ते जास्त ऊर्जा साठवणुकीला कारणीभूत ठरू शकतात.
Late Dinner : रात्री उशिरा जेवल्यानं कर्करोग होतो ? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
प्रथिनांची कमतरता देखील एक मोठी समस्या ठरु शकते. शिवाय, वारंवार स्नॅकिंग म्हणजे मधे मधे पदार्थ खाल्ल्यानंही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
बरेच लोक दिवसभरात थोडं थोडं खातात पण त्यांच्या नकळत किती कॅलरीज घेतल्या जातात हे कळत नाही. गोड पेयं किंवा कोल्ड्रिंक्स देखील शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढवतात. त्याचप्रमाणे, प्रथिनांची कमतरता ही एक मोठी समस्या असू शकते.
शरीराला पुरेशी प्रथिनं मिळत नाहीत, तेव्हा स्नायूंना ताकद मिळत नाही आणि चयापचय मंदावू शकतं. म्हणूनच, तज्ज्ञ प्रत्येक जेवणात अंडी, डाळी, मासे यासारखी प्रथिनं खाण्याचं आवाहन करतात.
