TRENDING:

हिवाळ्यात का उद्भवते केस गळण्याची समस्या? यामागचं नेमकं कारण काय?

Last Updated:

लोकांच्या कोणत्याच गोष्टी वेळेवर होत नाहीत. ना झोप, ना जेवण, ना नाष्टा. ज्याचा परिणाम शरीरावर होतो. ज्यामुळे आपले केस देखील कमकूवत होऊ लागतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 20 डिसेंबर : हिवाळ्यात केस तुटणे खूप सामान्य आहे. अनेक महिला याला बळी पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे अव्यवस्थित दिनचर्या. आजच्या धावपळीच्या जीवनात, लोकांच्या कोणत्याच गोष्टी वेळेवर होत नाहीत. ना झोप, ना जेवण, ना नाष्टा. ज्याचा परिणाम शरीरावर होतो. ज्यामुळे आपले केस देखील कमकूवत होऊ लागतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

यामुळेच केवळ तरुणच नाही तर आजकाल सर्व वयोगटातील लोक केस गळण्याने त्रस्त असतात. थंडीच्या दिवसात कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढते. ही देखील याची काही कारणे आहेत.

हिवाळ्यात त्वचा आणि टाळू कोरडे होतात, त्यामुळे केसांमध्ये पोषणाची कमतरता असते, हे केस गळण्याचे प्रमुख कारण आहे.

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे

थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे खूप सामान्य आहे, जे केसांसाठी चांगले नाही. गरम पाणी थेट डोक्यावर पडल्यास टाळूलाही इजा होते. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोंडा यासारख्या समस्या उद्भवतात.

advertisement

गरम पाणी केसांमधले नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढते.

थंडीत लांब अंतराने आंघोळ करावी

असे बरेच लोक आहेत जे थंडीत अंघोळ करत नाहीत किंवा अनेक दिवसांच्या अंतराने अंघोळ करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की थंडीत आंघोळ न केल्याने डोक्यातील कोंडा वाढतो, ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि टाळूमध्ये खाज सुटणे आणि जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

advertisement

त्यामुळे हिवाळ्यात केसगळती टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. हे उपाय केसांना पोषण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हिवाळ्यात का उद्भवते केस गळण्याची समस्या? यामागचं नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल