TRENDING:

Loksabha Elections : अमित शहांनी नागपूरऐवजी अकोल्यातच का घेतली बैठक? काय आहे या मागचं कारण?

Last Updated:

Loksabha Elections : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अकोला येथे भाजप नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अकोला, (कुंदन जाधव, प्रतिनिधी) : देशात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत महाराष्ट्रात दौरे वाढू लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात प्रचारासाठी आले आहेत. जळगावच्या सभेत (Loksabha Elections 2024) अमित शाह यांनी शरद पवारांसह विरोधकांवर घणाघाती टीका केली. यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांची अकोल्यातील भाजप बैठक पार पडली. ही सभा अकोल्यात का? घेतली यामागील कारण आता समोर आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
advertisement

विदर्भासाठी भाजपचा नवा प्लान

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अकोल्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. विदर्भातल्या 6 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणारी ही बैठक होती. 12 वाजून 52 मिनीटांनी अमित शहा यांची ही बैठक सुरू झाली होती तर 1 वाजून 40 मिनिटांपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री विखे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला, बुलढाणा, वाशिम-यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार कशा प्रकारे निवडून येतील यावर अमित शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर सहाही लोकसभेच्या कोणत्याही संभाव्य उमेदवारांबद्दल या बैठकीत चर्चा झाली नाही.

advertisement

बैठकीत उपस्थितांना लोकसभा प्रवास योजना या नावाचं पुस्तक देण्यात आलं. या पुस्तकात पत्रकार परिषदेत बोलताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे पत्रकारांना कोणती माहिती देण्यात यावी आणि कोणती नाही या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. अबकी बार 400 पार चा नारा या बैठकीत देण्यात आला आहे. तर 6 ही लोकसभा मतदार संघात भाजपच्याच नाही तर महायुतीतील प्रत्येक उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी अमित शहा यांनी उपस्थितांना दिली.

advertisement

वाचा - अमित शाहांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; शरद पवारांवर बरसले

जळगावच्या सभेतून पवारांवर हल्ला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

‘शरद पवारांना 50 वर्ष जनता सहन करतेय, पवारांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राची जनता 5 दशकं पवारांचं ओझं वाहत आहे’, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर थेट हल्ला केला. ‘महाविकासआघाडीच्या तीनचाकी ऑटोचे तीनही चाकं पंक्चर. महाराष्ट्राला पंक्चरवाली ऑटो विकास देऊ शकते का? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकते’, असं म्हणत अमित शाहांनी महाविकासआघाडीवर टीका केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Loksabha Elections : अमित शहांनी नागपूरऐवजी अकोल्यातच का घेतली बैठक? काय आहे या मागचं कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल