गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरलं. धान्य वाहून गेलं, कपडे वाहून गेले. पुराच्या पाण्याने होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे पुराच्या तडाख्यातून गाव कसंतरी वाचलं. मात्र हे गाव जिगाव प्रकल्पाच्या पुढील क्षेत्रात येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या गावाच्या पुनर्वसनासाठी कुठल्याच हालचाली प्रशासकीय पातळ्यांवर झाल्या नाहीत. त्यामुळे जिगाव धरण क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या या गावाचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि गावाला धरणग्रस्त म्हणून जाहीर करावं. यासाठी हे गावकरी उपोषणाला बसले आहेत.
advertisement
टोमॅटोनं शेतकरी झाले करोडपती, पण दुसरीकडे हाताशी आलेल्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर, असं काय घडलं?
गावकरी महिला, पुरुषांनी सांगितलं, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात आलेल्या पावसानं परिसरातील सर्वच नद्यांना महापूर आला. या महापुराचे पाणी अनेक गावात शिरलं. अनेक ठिकाणी घरे वाहून गेली, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य, अन्नधान्य, कपडे वाहून गेले. अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत हे गावकरी आहे. जिगाव धरण क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात येणार हे गाव पुनर्वसित करावे ही मागणी घेऊन संपूर्ण गावकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.. यावेळी पुराच्या तडाख्यातून वाचल्यानंतर सरकार आमचं गाऱ्हाणं ऐकून घेणार आहे की नाही असा उद्विग्न प्रश्न विचारात एका आजीबाईंना उपोषण मंडपातच हंबरडा फोडला..
वयोवृद्ध, लहान मुले, इतकंच काय तर जनावरांना घेऊन गावकरी उद्याच्या पिढीची बरबादी होण्यापासून रोखण्यासाठी एकत्र आलेत. सरकार आणि प्रशासनाशी दोन हात करण्याच्या तयारीत हे गावकरी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणावर बसलेत. झोपेत असलेले सरकार गावकऱ्यांच्या या उपोषणानंतरही जाग होणार आहे की नाही ? हाच खरा प्रश्न या गावकरी विचारत आहेत.
