राज्यभरासह मराठवाड्यात देखील गेल्या 48 तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पळशी गावातल्या शेतकऱ्यांचे तूर, मका यांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी अर्जुन पळसकर यांची डाळिंबाची फळबाग जमिनीवर पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे वर्षांची मेहनत वाया गेली आहे. शेतकरी हवालदिल झाले असून लाखोंच खर्च करूनही हातात काहीच लागणार नसल्याने चिंतेत आहे.
advertisement
Farmer Success Story: 3 वर्षांपासून लागवड, टोमॅटो शेतीने पालटलं शेतकऱ्याचं नशीब, आता कमाई लाखात!
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो सर्वांना अन्नधान्य पुरवतो. मात्र आज शेतकऱ्याची जगण्याची अवस्था बिकट झालेली आहे. फळबागांसाठी खत औषधाचा तुटवडा भासवतो, डाळिंबासाठी काही मोजक्या झाडांना फवारणी करायचं म्हटलं तर 500 रुपये खर्च येतो. शेतकरी घरातल्या लेकरांचा घास काढून या झाडांना लावतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला हातपाय टेकावे लागतात. अशावेळी शासनाने तात्काळ पंचनामे करून मदतीचा हात द्यावा, असे शेतकरी बाबासाहेब गायकवाड म्हणाले.





