पैठण येथील शेतकरी अंबादास फुके यांनी 1 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. जवळपास 10 ते 11 टन कांदा निघाला असता, मात्र शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच वाहून गेला आहे. फुके यांना या कांदा शेतीसाठी 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च लागला होता, कांद्याचे उत्पन्न चांगले निघाले असते. मात्र पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी फुके यांनी केली.
advertisement
पंचमुखी शिव, रुद्राक्षाची झाडे अन् निसर्गाची शिदोरी, वेरूळचं ‘महादेव वन उद्यान’ एकदा बघाच..! Video
हर्षेबुद्रुक गावातील शेती पिकांबरोबरच शेतातील विहिरी कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांना फटका बसला असून कापूस, तूर, ऊस पाण्यात गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तलाठी मंडळ व महसूल विभागाने तसेच पीक - विमा कंपन्यांनी त्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे.