TRENDING:

त्याचा स्वभाव हट्टी, पैसे दिले होते पण... रोहित आर्यच्या एन्काऊंटरवर केसरकर यांचा नवा दावा

Last Updated:

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यला गोळी लागली. त्यानंतर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्य सरकारने योजनेचे पैसे थकवले म्हणून रोहित आर्य याने मुंबई पवईमध्ये १७ मुलांना डांबून ठेवले. पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. शालेय शिक्षण विभागाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेचे काम करूनही पैसे मिळत नसल्याचे रोहित आर्य याचे म्हणणे होते. या सगळ्यावर तत्कालिन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दोन कोटी पैसे थकल्याचे मला अजिबात वाटत नाही. त्यांनी जेवढे काम केले तेवढे पैसे त्यांना दिले, असे केसरकर यांनी सांगितले.
रोहित आर्य-दीपक केसरकर
रोहित आर्य-दीपक केसरकर
advertisement

शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी आत्मीयता निर्माण होऊन, ते स्वच्छतादूत व्हावेत, यासाठी ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा’ची कल्पना आर्या यांना सुचली. राज्य सरकारने त्यांच्या कल्पनेचे रुपांतर योजनेत करून त्यांना काम दिले. परंतु त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न दिल्याने त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. अखेर १७ मुलांना डांबून ठेवून त्यांनी सरकारचे लक्ष्य आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

advertisement

त्याचा स्वभाव हट्टी, पैसे दिले होते पण...

दीपक केसरकर यांना याप्रकरणी अधिक विचारले असता, दोन कोटी पैसे थकल्याचे मला अजिबात वाटत नाही. त्याने जेवढे काम केले, तेवढे पैसे दिल्याचे आमच्या विभागाने सांगितले होते. मी काही पैसे चेकने दिले होते, पुन्हा अडचण निर्माण होऊ नये चेकने व्यवहार केला. परंतु त्याचा हट्टी स्वभाव होता त्यामुळे हा प्रकार घडला असेल, असे केसरकर म्हणाले.

advertisement

सरकारी नियम तोडून तर पैसे देऊ शकत नाही ना...

तसेच रोहित आर्य याच्या दाव्यानुसार केसरकर यांनी अनेक भेटी टाळल्या. यावर त्यांना विचारले असता, भेटी नाकारल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. त्याला मदत केल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. पण सरकारी नियम तोडून तर पैसे देऊ शकत नाही. मला एवढेच पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी हट्ट केला, असे केसरकर म्हणाले.

advertisement

रोहित आर्यने शाळकरी मुलांना स्वच्छतेची गोडी लावली होती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुड न्यूज! सोयाबीन दरात झाली वाढ, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्यानुसार रोहित आर्यने पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वखर्चाने राज्यातील शाळांमध्ये २०२२ मध्ये राबविण्यास सुरुवात केली. या प्रोजेक्टमुळे शाळांचा परिसर स्वच् राहू लागला. रोहित आर्यची दखल घेऊन शालेय शिक्षणमंत्री म्हणून केसरकर यांनी सरकारी निर्णय प्रसिद्ध केले. त्यानंतर हा प्रकल्प राबविण्यासाठी शिक्षण विभागाने २०२३ मध्ये काही प्रमाणात आर्थिक सहाय्य केल्याचे आर्या यांनी सांगितले. परंतु त्यानंतर केलेल्या कामाचे पैसे सरकारने दिले नाही. तब्बल २ कोटी रुपये थकविल्याचे त्याचे म्हणणे होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्याचा स्वभाव हट्टी, पैसे दिले होते पण... रोहित आर्यच्या एन्काऊंटरवर केसरकर यांचा नवा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल