अडणच आली तर संपर्क करा : सावंत
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी शहाजी कदम हे उपोषणाला बसले होते. उपोषणाला बसले असताना त्यांनी आत्महत्या केली होती. त्या कुटुंबाची आज पालकमंत्री सावंत यांनी येरमाळा गावात जाऊन भेट घेत सांत्वन केले. मंत्री सावंत यांनी मृत कदम यांच्या तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत पालकत्व स्वीकारले. कुटुंबाला कुठली अडचण आली तर काका संपर्क करा, असेही या भेटीदरम्यान आश्वासन दिले आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या तरुणांनी आत्महत्याचे विचार डोक्यात देखील आणू नका. सरकार तुमच्या पाठीशी असल्याचे आवाहन देखील सावंत यांनी केले आहे.
advertisement
उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (बुधवारी 6 सप्टेंबर) निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आले.
वाचा - मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मॅरेथॉन चर्चा, सह्याद्रीवर खलबतं
जरांगे पाटील उपोषणावर ठाम
सरकारने काल घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत. सरकरच्या शिष्टमंडळाने यावं चर्चा करावी आम्ही त्यांना पुरावे देण्यासाठी तयार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. तसेच हे आंदोलन असेच सुरू असणार असल्याचं देखील ते म्हणाले.