सांगलीतील ऋतुजा राजगे या गर्भवती तरुणीने धर्मांतरासाठी सासरचे लोक छळ करीत असल्याने आत्महत्या केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी सांगलीत विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर यांनी अतिशय आक्रमक आवेशात भाषण केले.
'लव्ह जिहाद'वाले हिरवे साप, ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर
हिंदू धर्म कोणावर अन्याय करणार नाही. ऋतुजा ही उच्च शिक्षित मुलगी होती. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. कोळी नामक नायब तहसीलदाराने ऋतुजाचे लग्न लावले तो आजही शासकीय सेवेत आहेत. पण सात महिन्यांची गर्भवती असताना छळापायी तिला जीवन संपवावे लागले. यापुढे धर्मांतर करण्यासाठी जो व्यक्ती गावात घरात येईल आणि बळजबरी करेल त्याला बदडून काढा. लव्ह जिहाद करणारे जसे हिरवे साप आहेत तसे ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत. अशा अजगरांवर जेसीबी फिरवण्याचे काम केले पाहिजे, असे पडळकर म्हणाले.
advertisement
धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा, पोलिसांचे मी बघून घेईन
धर्मांतर करणाऱ्यांच्या औलादीच्या कानावर माझा आवाज जात असेल तर त्यांनी ऐकावे. राजकारण आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, हिंदू धर्म टिकला पाहिजे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा, पोलिसांचे मी बघून घेईन. हिंदू धर्मावर अनेक आक्रमण झाली, पण हिंदू संपला नाही.
'त्याचा' सैराट करणाऱ्याला अकरा लाख बक्षीस
धर्मांतर करण्यासाठी गावात कोणी आलं तर त्याला ठोकून कोण काढा. गावागावात जसे बैलगाडी शर्यतीला बक्षीस असते, तशा पध्दतीने गावागावात धर्मांतरणासाठी येणाऱ्या ठोकून काढणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर केले पाहिजे. ठोकून काढल्यास पाच लाख रुपये आणि त्याचा सैराट करणाऱ्यास 11 लाख बक्षीस द्यायला पाहिजे. पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तयार आहे पण त्याला आता सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय, असे पडळकर म्हणाले.
