जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनीशिंगणापूरकडे जाणारा भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर राहुरीकडून येणाऱ्या रिक्षावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा अक्षरशः उडाली. रिक्षामध्ये बसलेले पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अधिकृत आकडेवारी आणि ओळख पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
advertisement
अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू
या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासीही जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने राहुरी व अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ शनीशिंगणापूर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शनीशिंगणापूर रोडवरील वाढती अपघातांची संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय
दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनीशिंगणापूर रोडवरील वाढती अपघातांची संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरली असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे ही वाचा :
