चकमीत मामा शहीद झाले
जनार्दन मामा हे जालना शहरातील बडी सडकला असलेल्या डॉ. काळे यांच्याकडे कंपाउंडर म्हणून काम करायचे. निजाम सैन्य रजाकर यांच्याकडून जनतेचे छळ सुरू झाल्यानंतर त्यांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला. टेंभुर्णी जवळीक पिंपळगाव इथे चकमकी दरम्यान त्यांना गोळी लागली. लोकांनी त्यांना देऊळगाव राजा इथे हलविले. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिथेच त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आले. मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल जालना शहरातील नागरिकांनी मुख्य चौकात त्यांचा पुतळा उभारला. आजही या चौकाला मामा चौक असे नाव आहे. दवाखान्यात काम करता असताना डॉक्टरांची मुले त्यांना मामा म्हणायची म्हणून त्यांचे नाव मामा असं पडले असं गणेश लाला चौधरी सांगतात.
advertisement
निजामशाही उखडून फेकणारे स्वामी रामानंद तीर्थ कसे होते? पुतण्यांनी सांगितल्या खास आठवणी
रजाकारांच्या विरोधात लढा
निजाम शासक मिर उस्मान अली हा होता. त्याचा मुख्य सरदार कासिम रिजवी हा मूळचा लखनऊचा होता. त्याकाळी पदवीधर असलेला कासिम रिजवी आपल्या नातेवाईकांकडे लातूर इथे आला होता. इकडे आल्यानंतर त्याने निजाम सैन्य जॉईन केलं. कासिम रिजवि यानेच रजाकार फौज तयार केली. निजाम सैन्याचा सेनापती असलेल्या कासिम रिजवी याने रज्जकर यांच्या मदतीने जनतेवर अत्याचार सुरू केल्यानंतर अनेक लोकांनी याला प्रतिकार केला. यामध्ये राधा किशन लाला, खडसे इत्यादी लोकांनी पाच सहा लोकांच्या ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये जनार्दन मामा हे देखील होते.
शिवाजी महाराजांना शस्त्र पुरवणाऱ्या पुण्यातल्या गल्लीची सुरूय अस्तित्वाची लढाई, Ground Report
मामांची कहाणी प्रेरणादायी
आपल्या मातृभूमीच्या रक्षणसाठी जनार्दन मामा यांच्यासह अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तब्बल एक वर्ष आणि एक महिना मराठवाड्यातील जनतेला उशीर स्वातंत्र्य मिळालं. जनतेमधून तयार झालेल्या क्रांतिकारकांनी ते निजामाच्या तावडीतून खेचून आणले. एका डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाउंडरने देखील या लढ्यात आपले योगदान दिले. मामांची ही कहाणी येणाऱ्या पिढ्यांना देखील प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेल.





