काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
शंभुराजे देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणांबाबतच्या बैठकांना बोलावलं. पण मी या बैठकांना जाणार नाही. उद्या 4 ते 5 मॅरेथॉन बैठका मुंबईत होणार असून ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे केली आहे. सरकारनं उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा अणि आम्हाला काय निर्णय घेतला याबाबत कळवावे असही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
advertisement
20 तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुले असून अंतरवालीतून आम्ही पाय बाहेर टाकला की सरकारसाठी चर्चेची दारं बंद होतील नंतर चर्चा नाही असंही ते म्हणाले. आंदोलनात हसू होईल असं कृत्य एकाही मराठ्याने आंदोलनात करू नये, फक्त शांत होऊन आंदोलनात बसा असंही ते म्हणाले. आम्हाला आवडलं तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई आणि मतदार संघातील दारात जाऊन बसणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
वाचा - पुण्याच्या निधी वाटपाचा वाद; भाजपच्या नाराजीनंतर अजितदादांचं विखेंकडे बोट
आता मराठा हे कुणबी असल्याचे ट्रकभर पुरावे सापडलेत. मग आरक्षणात देण्यात अडचण काय आहे? मराठ्यांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 13 तारखेला ओबीसींची बीडमध्ये सभा होणार आहे. यावर बोलताना तो तुमचा राजकारणासाठी वापर करतोय. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्या आहेत. आम्हाला तिथेच आरक्षण हवंय, त्याचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका, तो इकडे सभेत लोक दाखवतो आणि त्याच्यावरील केसेस मागे घेतो अशी टीकाही जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली. आभाळ आलं की तो फिरतो. त्याला निबार गोळी द्या असा टोला जरांगे पाटील यांनी सरकार आणि भुजबळ यांना मारला.