पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले की, “पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत पोलिस अधीक्षकांनी गेल्या दीड महिन्यापासून तयारी केली आहे. सर्व मंडळांसोबत समन्वयक म्हणून एका अंमलदाराची नियुक्ती केली आहे. मंडळ आणि पोलिस ठाण्याशी समन्वय ठेवण्यात येत आहे. एक दुवा म्हणून समन्वयक काम करीत आहेत. गणेशोत्सवासोबत ईद देखील साजरी होत आहे. शक्य त्या ठिकाणी मिरवणुका मागे-पुढे होतील, मिरवणुका समोरा समोर नाहीत, असे प्रयत्न आहेत. त्यास यशदेखील मिळत आहे.”
advertisement
गुन्हेगारांवर कारवाई
सक्रिय गुन्हेगार, अवैध धंदेवाले, अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, तसेच कुठे प्रतिबंधक कारवाई केली आहे. शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाला सर्वच मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.