देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. मागील काही महिन्यांत मंत्रिमंडळ बैठकीदिवशी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यातही कायम आहे.
कुणाची कुठे बदली?
१) सिद्धराम सालीमठ (आयुक्त, साखर, पुणे) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सालीमठ हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
advertisement
२) विकास मारुती पानसरे (अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई) यांची व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
कोण आहेत सिद्धराम सालीमठ?
सिद्धराम सालीमठ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यातील अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी ई-ऑफिस ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबवली. नगर जिल्ह्यातील त्यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून त्यांनी एमएससी केली. प्रशासनाचा दांगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
IAS सिद्धराम सालीमठ यांची प्रशासकीय कारकीर्द
साखर आयुक्त, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे महव्यवस्थापकीय संचालक, नगरविकास विभागाचे उपसचिव, महसूल उपायुक्त
IAS विकास पानसरे यांची प्रशासकीय कारकीर्द
विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.पानसरे मूळचे संगमनेर जिल्ह्यातील असून शिर्डीचे ते जावई आहेत. याआधी त्यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यानंतर कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.