Mumbai Weather: मुंबईवर पावसाचं संकट, कोकणातही मुसळधार कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला होता.
1/5
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला होता. तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती. आज 16 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला होता. तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती. आज 16 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार सरींमुळे मुंबईतील काही भागांमध्ये सामान्य जनजीवनावर परिणाम झाला होता. आजही दिवसभर मुसळधार सरी सुरू राहतील, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार सरींमुळे मुंबईतील काही भागांमध्ये सामान्य जनजीवनावर परिणाम झाला होता. आजही दिवसभर मुसळधार सरी सुरू राहतील, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम राहणार आहे. दोन्ही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत मुसळधार तर काही भागांत मध्यम पावसाच्या सरी होतील. सलग पावसामुळे नागरिकांना रस्त्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे
ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम राहणार आहे. दोन्ही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत मुसळधार तर काही भागांत मध्यम पावसाच्या सरी होतील. सलग पावसामुळे नागरिकांना रस्त्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने या भागासाठी यलो अलर्ट दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत सतत मध्यम ते जोरदार सरी पडत आहेत. आजही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाचे वातावरण असेल.
पालघर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने या भागासाठी यलो अलर्ट दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत सतत मध्यम ते जोरदार सरी पडत आहेत. आजही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाचे वातावरण असेल.
advertisement
5/5
कोकणातील रायगड जिल्ह्यात आज सर्वात मोठा इशारा देण्यात आला आहे. रायगडला आज रेड अलर्ट देण्यात आला असून, अत्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे. येथे मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यात आज सर्वात मोठा इशारा देण्यात आला आहे. रायगडला आज रेड अलर्ट देण्यात आला असून, अत्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे. येथे मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement