TRENDING:

Manoj Jarange : मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!

Last Updated:

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचं गणित बिघडवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मनोज जरांगेंनी आपला मोर्चा आता थेट निवडणुकीकडेच वळवल्याचं दिसतंय. यंदाच्या लोकसभेला जरांगे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता तर आहेच, मात्र त्यासोबतच राज्यभरात प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. खुद्द जरांगेंनीच या गोष्टीला हवा दिली आहे. आता हजारो उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात आले, तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागू शकते. यामुळे निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढेल. हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच तर निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर होतील का? असा सवालही पुढे येतोय.
मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!
मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!
advertisement

मनोज जरांगेंच्या मनात काय?

प्रत्येक गावातून लोकसभेला 5 ते 7 उमेदवार उभे करायचे

तालुक्यातून 250 हून अधिक उमेदवार उभे राहणार

प्रत्येक जिल्ह्यात एक हजारहून अधिक उमेदवार

ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनीही डिपॉझिट भरायचं

ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाहीत, त्यांच्यासाठी गावाने पैसे जमा करायचे

उमेदवार वाढले तर काय होणार?

जिथे आधी एका जागेवर 15 ते 16 उमेदवार दिसायचे तिथे हजार उमेदवार दिसतील

advertisement

निवडणूक आयोगाला तितकीच चिन्हही वाटावी लागतील

तितक्याच पटीत ईव्हीएमची संख्याही वाढवावी लागेल

ईव्हीएम वाढली तर मतदान करताना अधिकचा वेळ लागणार

मतदारांमध्ये चिन्ह आणि उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण होईल

एका ईव्हीएम बॅलट युनिटवर 16 उमेदवार असू शकतात

त्याहून अधिक उमेदवार झाल्यास 16 च्या पटीनुसार मशीन वाढवावी लागणार

सध्या ईव्हीएमचं तिसरं व्हर्जन त्यात 24 बॅलटिंग युनिट वाढवता येतात

advertisement

एका केंद्रात 384 उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं

त्याहून अधिक उमेदवार वाढवण्याची सोय सध्याच्या सिस्टीममध्ये नाही

काय म्हणाले माजी सहनिवडणूक आयुक्त?

अशा प्रकारे उमेदवारांची संख्या वाढली आणि ती 300 पेक्षा जास्त झाली तर ही निवडणूक मतदान पत्रिकेवर घेणंही निवडणूक आयोगासाठी कठीण होईल, असं मत माजी सह निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी व्यक्त केलं.

advertisement

'32 वा उमेदवार आला तर तिसरं बॅलट होईल. 48 वा उमेदवार आला तर चौथं बॅलट होईल, त्यामुळे आपल्याला बॅलट युनिट्स वाढवावी लागतील. बॅलट युनिट्स वाढवणं अशक्य नाही, पण प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचं होऊ शकतं,' असं शिरीष मोहोड म्हणाले.

नितेश राणेंची टीका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पीक कर्ज घेणाऱ्यासाठी गुड न्यूज; मुद्रांक शुल्काचा खर्च वाचणार, कसा होणार फायदा?
सर्व पहा

दरम्यान निवडणुका लढवण्याच्या जरांगेंच्या भूमिकेवर नितेश राणेंनी टीका केली आहे. 'मनोज जरांगेंना मराठा समाजही गांभिर्याने घेत नाही. मराठा समाजामध्येही त्यांचा फार विरोध व्हायला लागला आहे, कारण जरांगे आता मराठा समाजाबद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागले आहेत. जरांगे काय बोलतात याकडे जास्त लक्ष देत नाही', असं जरांगे म्हणाले.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल