मध्य रेल्वेकडून नागपूर- मिरज, न्यू अमरावती- पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष अशा एकूण 80 रेल्वे गाड्या पंढरीकडे धावणार आहेत. तसेच रेल्वेच्या सोबतच एसटी महामंडळाने देखील आषाढी वारीसाठी तयारी केली असून जादा बस सोडण्यात येणार आहेत. तर राज्य सरकारने पंढरीला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना सोयीने प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.
advertisement
Western Railway: गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून या मार्गावर विशेष रेल्वे!
पंढरीसाठी धावणार या गाड्या
नागपूर ते मिरज
नागपूर ते मिरज दरम्यान धावणारी ही गाडी 4 आणि 5 जुलैला सकाळी 8.30 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरज येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग हे थांबे असतील.
अमरावती ते पंढरपूर
अमरावतीहून पंढरपूरसाठी 2 आणि 5 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुटेल. तर पंढरपुरात दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, लंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे असतील.
खामगाव ते पंढरपूर
खामगावहून पंढपूरसाठी 3 आणि 6 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता ही गाडी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता ती पंढरपूरला पोहोचेल. या गाडीला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे असणार आहेत.
भुसावळ पंढरपूर अनारक्षित
भुसावळ येथून 5 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता पंढरपूरसाठी गाडी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढपुरात पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे असतील.