अर्थसंकल्पात बिहारला मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आलीय. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्वोदय योजना तयार केली जाणार आहे. बिहारमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी ५८ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. यातील २६ हजार कोटी महामार्गांसाठी असणार आहेत. राज्यात तीन एक्सप्रेस वेसुद्धा तयार केले जातील. याशिवाय आंध्र प्रदेशसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
advertisement
Income Tax Slabs 2024-25: तुमचा पगार 30 हजार असेल तर तुम्हाला किती Tax द्यावा लागेल?
सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. जेडीयू टीडीपीच्या मागण्या पूर्ण करून खैरात बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा प्रयत्न आहे. त्यांना निधी दिला त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. पण जो महाराष्ट्र जो सर्वाधिक महसूल देतो त्या महाराष्ट्राच्या वाट्याला तोंडाला पानं पुसली आहेत अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली.
ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, दिल्ली वाऱ्या करतं ते सध्या काय करतंय. ट्रिपल इंजिन सरकारची या सरकारमध्ये भूमिका आहे असं एनडीए सरकारला वाटत नाही का? वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोस दान का पडलं नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनी द्यायला हवं, एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.