चाकणकडून एमआयडीच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढील चाक अचानक तुटल्याने रिक्षाचे संतुलन बिघडले. त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. चाकणच्या कल्याणी हॉटेलजवळील अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामसुंदर राम खिलावन शाखेद, पिंटू राजन बिहारा असे मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
advertisement
चाकणमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची भरमसाठ संख्या आहे. रिक्षा प्रवासासाठी तीन प्रवासींची मर्यादा असताना सात पेक्षा अधिक लोक रिक्षातून प्रवास करतात. त्यामुळे अपघातात वाढ झाल्याचे चित्र आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 4:50 PM IST
