रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. घाडगे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्यावर 50 कोटींचा दावा आणि जाहीर लेखी माफी मागावी अशी आम्ही नोटीस पाठवली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यक्तिक राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयत्न
रणजितदादांनी एक रुपया देखील ऊस मुकादमाकडून घेतलेला नाही. तंदुरूस्ती प्रमाणपत्रासंबंधित एकही प्रकरण झालेले नाही. आज अखेर एकही तक्रार रणजित निंबाळकर यांनी मारहाण केलीय म्हणून झालेली नाही. जयश्री आगवणे या मोक्कामधील आरोपी आहेत. त्यांच्यावर 353 चा गुन्हा आहे. दुसरीकडे सुषमा अंधारे वैयक्तिक राजकीय अजेंडा राबवत आहेत, असे निंबाळकर यांचे वकील घाडगे म्हणाले.
advertisement
फलटणमध्ये २१ रणजितसिंह निंबाळकर आहेत
ननावरे नावाच्या व्यक्तीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे आत्महत्या केलीये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. मात्र ती व्यक्ती माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर नाही, असे त्यांच्या भावाने प्रतिज्ञापत्र दिले आहे. फलटणमध्ये २१ रणजितसिंह निंबाळकर आहेत, असा दावाही धीरज घाडगे यांनी केला.
कारखान्याचा आणि निंबाळकरांचा २०१९ पासून कोणताही संबंध नाही
दिगंबर आगवणे विरोधात रणजितसिंह निंबाळकर यांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही. 2019 पासून कारखान्याचा आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ऊस मुकादम आणि त्याला झालेली मारहाण यावरून आमच्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत, असे घाडगे म्हणाले.
वेळा बदलीची संधी असून फलटण का मागितले?
पोलिसांनी युवती डॉक्टरच्या विरोधात 3 तक्रारी केल्या आहेत. जर त्रास होत होता तर तीन वेळा बदलीची संधी असून फलटण का मागितले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांनी मयत मुलीच्या घरी जाऊन सहानभूती दाखवायला हवी. रणजितसिंह निबाळकर यांची बदनामी करण्यासाठी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, असे घाडगे म्हणाले.
