TRENDING:

गुवाहाटीमध्ये आमदाराने जेवण सोडले, हॉटेलवरून उडी मारणार होता; गुवाहाटीचा आणखी एक किस्सा समोर

Last Updated:

बंडखोरीच्या वेळी आम्हाला एका एका आमदाराची चिंता होती. कारण एखादा आमदार कमी-जास्त झाला असता तर आमची आमदारकी रद्द झाली असती, असं संजय शिरसाठ म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी समर्थकांसह बंड पुकारले आणि ते थेट गुवाहाटी गाठली. या दौऱ्यात शहाजीबापू पाटलांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’, हा संवाद प्रचंड गाजला. आजही दिल्ली ते गल्लीपर्यंत हे किस्से सांगितले जातात.आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी तणावाखाली आलेल्या एका आमदाराचा अनुभव सांगितला. गुवाहाटीतील बंडखोरीदरम्यान शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर एवढे तणावाखाली होते की त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता, अस गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे. विशेष म्हणजे तो किस्सा खरा होता अशी प्रतिक्रिया आमदार कल्याणकर यांनी दिली.
News18
News18
advertisement

संजय शिरसाट म्हणाले, मी गेली 42 वर्षं राजकारणात आहे. आयुष्यातील ही माझी तिसरी बंडखोरी होती, पण आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच वेळ होती. त्या वेळी आम्ही संख्या मोजत होतो. कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवणही सोडले होते. चेहऱ्यावर सतत भीती होती, आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल? याची त्यांना चिंता होती. एवढा तणाव आला होता की ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते.

advertisement

आम्हाला  एका एका आमदाराची चिंता: संजय शिरसाट 

बंडखोरीच्या वेळी आम्हाला एका एका आमदाराची चिंता होती. कारण एखादा आमदार कमी-जास्त झाला असता, तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती. म्हणून आम्ही बालाजी कल्याणकर यांच्यासोबत दोन माणसं नेहमी ठेवली होती, असेही संजय शिरसाट म्हणाले.

50 कोटीसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी घेतला निर्णय 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

संजय शिरसाठांच्या वक्तव्याला आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी देखील पहिल्यांदाच त्यावेळी त्यांची मनस्थिती काय होती, हे सांगितले. माझे दुहेरी मन होते, माझे मन खचत होतं, मी काही चूक करतोय का? जनतेला धोका देतोय का असे विचार डोक्यात सुरु होते. जनतेने आपल्याला मत दिलीत आपण गद्दारी करतोय का? असे विचार मनात येत होते. त्यामुळे मी तीन दिवस जेवलो नाही , हॉटेलवरुन उडी मारावी असे विचार येत होते. पण शिंदे साहेबांनी विश्वास दिला. आपण जनतेच्या कामासाठी उठाव करतोय अस सांगितले. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो असे कल्याणकर म्हणाले. 50 कोटीसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचेही कल्याणकर म्हणाले..

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुवाहाटीमध्ये आमदाराने जेवण सोडले, हॉटेलवरून उडी मारणार होता; गुवाहाटीचा आणखी एक किस्सा समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल