उदयनराजे भोसले आज भिलार येथे उदयनराजे हे लोकांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांबरोबर बोलत असताना त्यांनी विविध प्रश्नांना त्यांच्या वेगळ्या शैलीत उत्तर दिली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले. पत्रकार माझ्या दौऱ्याबद्दल जे प्रश्न विचारणार आहात. त्यामुळं मला गुंगी आली आहे, अशा प्रकारची मिश्किल टिपणी सुरुवातीलाच खासदार उदयनराजे यांनी केली. यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काय आहे. मी आधीच सांगितलेलं आहे. मी उभा राहणार म्हणजे राहणार, अशी स्पष्ट भूमिका उदयनराजे यांनी मांडली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
advertisement
अद्याप भाजपने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले मी आत्ताच किंगबेरीच्या गुहेत गेलो होतो. तिथं बरेच पक्षी बघितले ते काय ठरवतात ते बघू की ते पक्षी माझ्याबरोबर आहेत. बाकीच्यांचं मला आता माहित नाही, अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली.
पवारांना टोला
उदयनराजे भोसलेंनी पुन्हा कॉलर उडवत ही माझी स्टाईल आहे. माझ्या कॉलर उडवण्यावर टिका झाली. कॉलर काढुन घ्या, अन्यथा काहीही काढुन घ्या. मात्र, माझ्यावर असलेलं लोकांच प्रेम कोणी काढुन घेवु शकत नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी पावसावर देखील भाष्य केलं. पावसामुळं सगळं झालं असं काही लोक म्हणत असतील. निवडणुकीत पाऊस पडला पाहिजे. मात्र, पाऊस पडणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना पाणी हवं आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. विरोधकांच माझ्यावर प्रेम आहे. यावेळी बच्चा समझके छोड दिया असं ते म्हणत असले तरी आता मी बच्चा राहिलो नाहीस मला माझं काम केलच पाहिजे, असंही उदयनराजे म्हणाले.
पवारांनी उडवली होती कॉलर
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर समर्थक अगदी फिदा आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात कॉलर उडवली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट शरद पवारांनी कॉलर उडवून एकप्रकारे उदयनराजेंना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.
वाचा - अखेर भावासाठी धावून आले प्रकाश आंबेडकर; अमरावतीबाबत घेतला मोठा निर्णय
वैचारीक मतभेद असु शकतात. मात्र, त्यांचे विचार त्यांच्यापाशी माझे विचार माझ्यापाशी. चर्चेतुन मार्ग निघु शकतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मोठा आहे. श्रीनिवास पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे ज्यांना कोणाला उभं राहायचय त्यांनी राहावं, असंही उदयनराजे म्हणाले.