Solapur News : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे गायीच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला होता.यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सासू रशिका विठ्ठल रेडे (वय 57) आणि सून सुवर्णा अमोल रेडे (वय 27) यांचा अशी या मृत महिलांची नावं आहे.या दोघींसह एक गायही दगावली आहे. ही घटना सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली आहे.या घटनेने रेडे कुटुंबियांवर आणि ग्रामस्थावर शोककळा पसरली आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला आणि यामुळे एका गाईसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली आहे.
त्याचं झालं असं की सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली त्यांना दिसली. यावेळी गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रशिकाबाईंना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता त्या नाही या विजेचा झटका बसून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोठ्यात विजेचा प्रवाह उतरल्यामुळे रशिका रेडे आणि सुवर्णा रेडे यांचा मृ्त्यू झाला. या दोघींसह एक गायही दगावली आहे.
दरम्यान रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
