TRENDING:

Ashadhi Wari 2025: ...तर वारकऱ्यांना मिळणार 4 लाखांची मदत, महायुती सरकारनं आणली योजना

Last Updated:

Ashadhi Wari 2025: महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025’ जाहीर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. या वारीत सहभागी वारकऱ्यांचा अपघात झाल्यास सरकार मदतीचा आधार देणार आहे. त्यासाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025’ जाहीर केली आहे. त्यानुसार अपघाताने अथवा दुर्घटनेत एखाद्या भाविकाचा मृत्यू झाल्यास वारसांना 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात राहिल्यास 16 हजारांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. याबाबत महाराष्ट्र शासनाचे सहसचिव संजय इंगळे यांनी आदेश जाहीर केला.
Ashadhi Wari 2025: ...तर वारकऱ्यांना मिळणार 4 लाखांची मदत, महायुती सरकारनं आणली योजना
Ashadhi Wari 2025: ...तर वारकऱ्यांना मिळणार 4 लाखांची मदत, महायुती सरकारनं आणली योजना
advertisement

Ashadhi Wari 2025: आली आषाढी वारी, रेल्वे नेणार पंढरीच्या दारी! भाविकांसाठी 80 गाड्या, वेळापत्रक

काय आहे योजना?

महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025’ जाहीर केली आहे. यामध्ये 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत अपघात अथवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदत दिली जाणार आहे. त्यामधेट अपघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत केली जाईल. तर वारी दरम्यान अपंगत्व आल्यास वारकऱ्यांना 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रुपये, 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजार रुपये मदत देण्यात येईल. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यास 16 हजार रुपये, तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास 5 हजार 400 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

advertisement

योजनेसाठी आवश्यक बाबी

  • ही योजना आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी, खासगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरीता लागू राहणार आहेत.
  • मदतीचा दावा करणाऱ्या वारकरी किंवा त्यांच्या वारसांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत संबंधित वारकरी आषाढी यात्रेकरीता पंढरपूर येथे गेल्याबाबत संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  • सर्व तहसीलदार संबंधित वारकरी यात्रेकरीता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी व त्यांच्या वारसदारांना निर्गमीत करणार आहेत.
  • advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Ashadhi Wari 2025: ...तर वारकऱ्यांना मिळणार 4 लाखांची मदत, महायुती सरकारनं आणली योजना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल