तुळजापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे रेल्वे संपर्क व्हावा, अशी मागणी दीर्घकाळापासून होत होती. मात्र उत्पन्नाच्या दृष्टीने हा मार्ग परवडणारा नसल्याचा (नॉट फिजिबल) शेरा मारत रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प अडगळीत टाकला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर 2019 साली हा प्रकल्प रेल्वेच्या पिंक बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी प्रकल्पाची एकूण किंमत 904 कोटी 92 लाख रुपये इतकी होती.
advertisement
होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट, 209 विशेष गाड्या धावणार, पाहा मार्ग
तत्कालीन महायुती सरकारने प्रकल्पाच्या 50 टक्के खर्चाची जबाबदारी स्वीकारत 452 कोटी 46 लाख रुपयांचे दायित्व घेतले होते. दरम्यान, प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, सध्या या रेल्वेमार्गाची एकूण किंमत 3295 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे दायित्व वाढून 1647 कोटी रुपये झाले आहे. यापैकी 40 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, आता मंजूर झालेल्या 150 कोटी रुपयांमुळे प्रकल्पाच्या कामाला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






