काय आहे योजना?
देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावं 15 ऑगस्ट रोजी नावे एका झेंड्यावर कोरण्यात येणार आहे. हा झेंडा सजवण्यात येईल त्यानंतर तो महापालिका आवारात लावण्यात येईल. शीलाफलकम असं या उपक्रमाचं नाव आहे. या उपक्रमातून देशासाठी सर्वस्व वेचणाऱ्या सैनिकांची किर्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यात मदत होईल. शहीदांची आठवण राहील आणि त्यांची कीर्ती पुढील पिढी पर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय.
advertisement
डोंबिवलीच्या रस्त्यावर फिरणारी बैलगाडी कुणाची? पाहा Ground Report
माझी माती माझा देश या संकल्पनेवर आधारित एक पणती हातात घेऊन फोटो काढावे आणि केंद्र सरकारच्या माझी मती माझा देश या वेब पोर्टल वर अपलोड करावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केलंय.
या दरम्यान महापालिका परिक्षेत्रात वृक्षारोपण करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात वृक्ष रोपण करावे, असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलंय.





