भिवंडीतील शांतीनगर परिसरात ही घटना घडली असून जिशान अन्सारी असं हत्या झालेल्या २५ वर्षीय युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिशान अन्सारी आणि आरोपी असलेले हसन मेहबुब शेख (वय २२), मकबुल मेहबुब शेख (वय ३०), हुसेन मेहबुब शेख (वय २८) हे तिघे भाऊ एकाच गोदामात हमालीचे काम करत होते. एकाच परिसरात राहत होते. त्यांच्यात कामावरून काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता.
advertisement
या वादातून राग मनात धरून हसन आणि त्याच्या दोन भावांनी, तसेच सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजीद या पाच जणांनी जिशानच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी जिशान दुचाकीवरून घरी आला. तो दुचाकीवरून उतरत असताना हसन याने त्याला लाथ मारून खाली पाडले. ही लाथ वर्मी लागल्याने जिशानचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. केवळ लाथ मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.