TRENDING:

Wardha News: स्वातंत्र्य दिनी तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात खळबळ

Last Updated:

Wardha News : एका दिवसात तिघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या तिघांनीही यापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेंद्र मते, प्रतिनिधी, वर्धा : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वर्धा जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने प्रशासन आणि नागरिकांना हादरवून सोडले. एका दिवसात तिघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या तिघांनीही यापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक घटना
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक घटना
advertisement

आत्मदहनाची पहिली घटना सकाळी 9 वाजता घडली. बांधकाम विभागात कंत्राटदार बाबा जाकीर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांचे दीड कोटी रुपयांचे देयक थकीत असून, संबंधित अभियंत्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जाते. कंत्राटदार बाबा जाकीर यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले.

advertisement

दीड कोटीचे बिल थकले...

बाबा जाकीर यांच्या दीड कोटी रुपयांच्या देयकांची फाइल महिन्यापासून प्रलंबित असून, कार्यकारी अभियंता अंभोरे यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा देखील आरोप आहेय. आज सकाळी त्यांनी बांधकाम विभागाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला आणि तातडीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 20 दिवसांपूर्वीही बाबा जाकीर यांनी अशाच प्रकारचा प्रयत्न करत बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली होती.

advertisement

अवघ्या तासाभराने दुसरी घटना...

अवघ्या तासाभराने दुसरी घटना घडली. सकाळी 10 वाजता पाच वर्षांपासून वेतन न मिळाल्यामुळे दोन गटसचिव जितेंद्र तरासे आणि महेंद्र ठाकूर यांनी शहरातील आरती चौकात आत्मदहनाचा प्रयत्न केला. दीर्घकाळ पगार न मिळाल्याने वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. आत्मदहनााचा प्रयत्न असल्याचे दिसताच पोलिसांनी तातडीने दोघांना अटकाव केला आणि ताब्यात घेतले.

advertisement

गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे एकाच दिवशी तिघांकडून आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनांची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आणि संबंधित विभागांनी तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha News: स्वातंत्र्य दिनी तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल