नेमका वाद काय होता?
नुकत्याच झालेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी 'कोरस' कंपनीचे मार्कर पेन वापरण्यात आले होते. मात्र, ही शाई लावल्यानंतर काही वेळातच पुसली जात असल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर आल्या. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मार्कर पेन का सुरू झाले होते?
advertisement
२०१२ पर्यंत निवडणुकांसाठी म्हैसूर पेंट्सच्या शाईच्या बाटल्यांचा वापर व्हायचा. मात्र, शाईच्या बाटल्या हाताळणे जिकिरीचे असते आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कोरस कंपनीचे 'इंडेलिबल इंक' मार्कर वापरण्यास सुरुवात केली होती. पल्स पोलिओ मोहिमेतही हेच मार्कर वापरले जातात, असा दावा करत आयोगाने या बदलाचे समर्थन केले होते.
हे देखील वाचा: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ लाईव्ह अपडेट्स
आता पुन्हा 'म्हैसूर' पॅटर्न
केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभेसाठी वर्षानुवर्षे कर्नाटकातील 'म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लि.' कंपनीची शाई वापरते. ही शाई अत्यंत खात्रीशीर मानली जाते. आता राज्य निवडणूक आयोगानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी याच शाईकडे वळण्याचे संकेत दिले असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटावर लावली जाणारी निळी शाई देशात प्रामुख्याने कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड आणि हैद्राबाद येथील रायुडू लॅबोरेटरी येथे तयार केली जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अनेक वर्षांपासून म्हैसूर कंपनीचीच शाई वापरली जात आहे. राज्य निवडणूक आयोगानेही दीर्घकाळ हीच शाई वापरली होती.
