पेन्शनची वाट बघत अनेक पेन्शनर्सनी जगाचा निरोप घेतला आहे, मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या फंडातील रक्कम वारसांना मिळत नाही. पेन्शनर्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 वर्षांत सरकारने तब्बल 1 लाख 16 हजार 64 कोटी रुपयांची रक्कम हडपली आहे. ही रक्कम पाहिली तर, सरकारला पेन्शनर्सची मागणी पूर्ण करणे सहज शक्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
'आमची मागणी अवाजवी नाही!'
पेन्शनर्सची प्रमुख मागणी आहे की, त्यांना दरमहा 7500 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता (मेडिकल) मिळावा. हे सर्व पेन्शनर 65 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना या पैशांची नितांत गरज आहे. गेली 10 ते 15 वर्षे आंदोलने करूनही आणि सरकारकडे पैसे शिल्लक असूनही, सरकार फक्त आश्वासने देत आहे, पण कोणताही ठोस निर्णय घेत नाही. हा सरकारचा नाकर्तेपणा, आडमुठेपणा की वेळ काढूपणा आहे, असा संतप्त प्रश्न पेन्शनर्स विचारत आहेत.
दरवर्षी देशात अंदाजे 1 लाख पेन्शनर्सचा मृत्यू होतो आणि त्यांच्या फंडातील पैसे वारसांना मिळत नाहीत. सरकारने या रकमेवरही डल्ला मारला असल्याचा आरोप पेन्शनर्स करत आहेत. त्यामुळे, या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पेन्शनर्सनी गणपती बाप्पांकडे साकडे घातले आहे की, 'सरकारला सद्बुद्धी दे आणि आमच्या पेन्शनचा प्रश्न लवकर सोडव'.
हे ही वाचा : कंटेट क्रिएटर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं भयानक भविष्य, PHOTO पाहूनच हादराल
हे ही वाचा : Maharashtra Govt : बाप्पा पावला! राज्य सरकारची मेगा भरती, या 10000 जणांना मिळणार शासकीय नोकरी