नीता अंबानी यांना हा पुरस्कार त्यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामांची दखल घेऊन देण्यात आला. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशनने शिक्षण, क्रीडा, आरोग्य, ग्रामीण विकास, कला-संस्कृती आणि महिला सशक्तीकरण अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. देशभरातील लाखो लोकांपर्यंत या उपक्रमांचा फायदा पोहोचला आहे, ज्यामुळे समाजातील दुर्बल वर्गांना थेट मदत मिळाली आहे.
advertisement
या कार्यक्रमात सुमारे 40 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने नीता अंबानी यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादर करून आपला आनंद आणि सन्मान व्यक्त केला. संपूर्ण वातावरण उत्साह आणि अभिमानाने भरलेले होता, ज्यामुळे हा सन्मान आणखी खास झाला.
कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही जगातील सर्वात मोठी आदिवासी शिक्षण संस्थान मानली जाते. इथं हजारो आदिवासी मुलांना मोफत शिक्षण, निवास, जेवण आणि कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. या संस्थेचा उद्देश समाजातील मागास वर्गांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करणे आहे. हा सन्मान केवळ वैयक्तिक उपलब्धी नाही तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच CSR च्या कामांना देखील ओळख देतो.
नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सामाजिक कार्यांनी हे दाखवून दिलं आहे की, कॉर्पोरेट क्षेत्रही समाजात मोठा बदल घडवू शकतो. एकूणच, हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि समाजासाठी असलेल्या त्यांचा वचनबद्धतेचा मोठा गौरव समजला जात आहे.
