गणपती विशेष गाडी एलटीटी येथून 26 आणि 27 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजता सावंतवाडी रोडकडे रवाना होईल. याचप्रमाणे सावंतवाडीहून परतीची गाडी 01110 क्रमांकाने 26 आणि 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.45 वाजता सुटेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
advertisement
कशी आहे गाडी?
गाडीमध्ये एकूण 22 एलएचबी कोच असणार असून, त्यामध्ये 1 प्रथम श्रेणी, 1 द्वितीय श्रेणी, 5 तृतीय श्रेणी, 8 शयनयान आणि 4 सामान्य डबे असतील. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांना बसण्याची सोय होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे अनेक प्रवाशांना आरक्षण मिळण्यात अडचणी येत असतात. या विशेष गाड्यांमुळे त्यांना मोठा फायदा होईल. तसेच, मध्य रेल्वेने महाराष्ट्र व कोकण विभागातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन 306 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मडगाव, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या स्थानकांवरून या गाड्या धावणार आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायी होणार आहे. तर नागपूरच्या दिशेनेही 01101 क्रमांकाची सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सोडण्यात येणार असून तिचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.






