अपघातापूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत फेरीवाल्यांना हटवले आणि रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी रिक्षांची अनियंत्रित गर्दी ही मुख्य समस्या कायम होती. नवीन बंदीमुळे वाहतूक कोंडीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! होळीला धावणार 186 स्पेशल ट्रेन, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक
तथापि बेस्ट बसचे धोकादायक वळण हा प्रश्न अद्याप कायम आहे. बस प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथलगत वळण घेत असल्याचे चित्र आजही दिसते ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवासी अशोक अहेर यांनी रिक्षा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत रिक्षाचालकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरील छताचे काम अद्याप अपूर्ण आहे. परिणामी अर्ध्या फलाटावर प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. काही जण छत्र्यांचा किंवा जवळील शेडचा आधार घेतात तर काही प्रवासी उन्हापासून बचावासाठी छपराखाली थांबून ट्रेन येताच धाव घेताना दिसतात.






