TRENDING:

Mumbai Rains Updates : मोठी बातमी! मुंबईत NDRF दाखल, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, कुर्ला एलबीएस मार्गावर तळं

Last Updated:

Mumbai Rains Updates : मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एनडीआरएफचे एक पथक मुंबईत अलर्ट मोडवर दाखल झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मागच्या 72 तासांपासून आभाळ फाटल्यासारखा मुंबई पाऊस सुरू आहे. दादर, माटुंगा, लालबाग परळ, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, ठाणे, मुलुंड, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंधेरीमध्ये देखील पाणी साचलं आहे. मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एनडीआरएफचे एक पथक मुंबईत अलर्ट मोडवर दाखल झाले आहेत.
मोठी बातमी! मुंबईत NDRF दाखल, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, कुर्ला एलबीएस मार्गावर तळं
मोठी बातमी! मुंबईत NDRF दाखल, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, कुर्ला एलबीएस मार्गावर तळं
advertisement

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कुर्ला परिसरात तब्बल पाच फूट पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. पाण्याचा प्रवाह इतका वाढला आहे की एलबीएस रोडवरील अनेक दुकानांत पाणी शिरले आहे. काही कार अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत, तर बेस्ट बसचा जवळपास अर्धा भाग पाण्यात बुडाल्याचे दृश्य समोर आले आहे. नागरिकांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.

advertisement

मिठी नदीच्या पातळीत वाढ, एनडीआरएफचे पथक तैनात...

दरम्यान, मिठी नदीची पाणीपातळी चिंताजनकरीत्या वाढली असून नदीने धोक्याच्या इ्शाऱ्याजवळील पातळी गाठली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

350 नागरिकांचे स्थलांतर

मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.या नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या महानगरपालिकेच्या मगन नथुराम मनपा शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी 3.9 मीटर वरून आता 3.6 मीटर इतकी झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Rains Updates : मोठी बातमी! मुंबईत NDRF दाखल, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, कुर्ला एलबीएस मार्गावर तळं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल