मुंबई आणि नवी मुंबई वॉटर टॅक्सीने जोडण्याच्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी नितेश राणे यांनी वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना राणे यंनी यावेळी दिल्या आहेत. बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
advertisement
Thane Water Cut: पाणी आताच भरुन घ्या आणि तारीखही लिहून घ्या! ठाण्यात या दिवशी बंद राहणार पाणीपुरवठा
प्रवासाचा वेळ वाचणार
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. या सेवेमुळे मुंबईची नवी मुंबईतील विविध भागांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे 40 मिनिटे असेल.
प्रदुषण कमी
या वॉटरटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला देखील फायदा होईल. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होईल.