चूरू - पती-पत्नीचे नाते सात जन्माचे असते असे म्हटले जाते. मात्र, लग्नाच्या 7 महिन्यानंतरच एका दाम्पत्यासोबत धक्कादायक घटना घडली. मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी जात असलेल्या एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दयाप्त असे मृताचे नाव आहे. 26 वर्षीय दयाप्त हा हमीरवास येथील रहिवासी होता. चूरू-सरदारशहर रस्त्यावरील पिपलाना जोहडजवळ हा भीष अपघात झाला. दयाप्त याच्या पत्नीच्या हातावरील मेहंदीचा रंग अजून उतरलाही नव्हता. मात्र, त्याआधीच दयाप्तचे निधन झाले. याबाबत ठिमोलीचे सरपंच संजय प्रजापत यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
advertisement
ठिमोली येथील रहिवासी खेमचंद सऊदी हा अरब येथून आला होता आणि रामपुरा येथे भाचाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बसने चुरू येथे उतरला. तर हमीरवास येथील दयाप्त मावशीच्या मुलाच्या लग्नात आपल्या पत्नीसह रामपुरा येथे आला होता. तो दुचाकीने त्याचा मामा खेमचंदला घ्यायला आला होता आणि मामाला परत घेऊन दुचाकीने रामपुरा गावी जात होता.
आधी मुलाला दिला जन्म अन् मग फरार झाली आई, तिनं असं का केलं?
त्याचवेळी पिपलाना येथे मागून अत्यंत वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला टक्कर दिली आणि या भीषण अपघातात 38 वर्षीय खेमचंद आणि त्याचा 26 वर्षांचा भाचा दयाप्त भीषण जखमी झाले. यानंतर त्यांना तत्काळ राजकीय भरतिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. नवरा-बायको दोघेही हसत-खेळत आयुष्य जगत होते. मात्र, दुर्दैवाने दयाप्तचा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.