TRENDING:

Thane- Nashik Highway : कोंडीत अडकलेला महामार्ग; ठाणे-नाशिक प्रवास वेळेत नव्हे तर पैशात मोजावा लागतो

Last Updated:

Traffic Congestion : ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी हा केवळ प्रवासातील त्रास नाही तर ती राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका देत आहे. अभियांत्रिकी तज्ज्ञ राजेंद्र उत्तूरकर यांच्या मते, या महामार्गावरील कोंडीमुळे दरवर्षी सुमारे 5 हजार 200 कोटी रुपयांचे इंधन वाया जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे, भिवंडी, शहापूर आणि कसारा मार्गे नाशिकला जोडणारा हा महामार्ग औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, वाढती वाहनसंख्या, रस्त्याची अपुरी रुंदी आणि रखडलेले चौपदरीकरण यामुळे रस्त्याची वहन क्षमता संपली आहे. भिवंडी बायपास, वडपे आणि कसारा घाट या ठिकाणी दररोज अनेक किलोमीटर लांब रांगा लागतात. वाहनचालक सांगतात की 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास अनेकदा दोन ते तीन तासांवर जातो.
ठाणे-नाशिक महामार्गावर दरवर्षी ५ हजार कोटींचे इंधन वाहतूक कोंडीत जळते
ठाणे-नाशिक महामार्गावर दरवर्षी ५ हजार कोटींचे इंधन वाहतूक कोंडीत जळते
advertisement

कोंडीत वाहनांचे इंजिन सतत चालू ठेवावे लागल्याने इंधनाचा मोठा अपव्यय होतो. अंदाजानुसार, सात ते आठ लाख वाहने दररोज या मार्गावर धावतात त्यातील सुमारे अर्धी कोंडीत अडकतात. प्रत्येक वाहन सरासरी 30 मिनिटे इंजिन चालू ठेवते, ज्यात 0.5 ते 1 लिटर इंधन वाया जाते. त्यामुळे दररोज 30 ते 40 हजार लिटर पेट्रोल-डिझेल जळते.

advertisement

या अपव्ययाचा आर्थिक परिणाम प्रचंड आहे. इंधनाचा थेट खर्च 2200 ते 2900 कोटी रुपये, वाहनांच्या जादा देखभालीचा 500 ते 800 कोटी, उत्पादनक्षम वेळेच्या नुकसानीचा 1,095 कोटी, पुरवठा साखळीतील अडचणींचा 1200 ते 1500 कोटी, तर आरोग्यविषयक खर्च 200 ते 300 कोटी इतका होत असल्याचे अंदाज आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणाची पातळीही झपाट्याने वाढत आहे. शहापूर व कसारा परिसरात पीएम 2.5 आणि पीएम 10 या प्रदूषणकणांचे प्रमाण मानक मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट झाले आहे. रहिवासी सांगतात की, सकाळी खिडकी उघडली तरी डिझेलचा वास येतो आणि मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

वाहनचालक आणि प्रवासी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण आणि सुधारणा करण्याची आश्वासने वर्षानुवर्षे दिली जात असली तरी प्रत्यक्षात कामे कासवगतीने सुरू आहेत. नागरिकांचा प्रश्न एकच घोषणांपेक्षा कृती कधी होणार?.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Thane- Nashik Highway : कोंडीत अडकलेला महामार्ग; ठाणे-नाशिक प्रवास वेळेत नव्हे तर पैशात मोजावा लागतो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल