पायाभूत सुविधा, उत्पादन, डिजिटल स्वरुपातील सार्वजनिक वस्तुमाल आणि व्यवसाय सुलभता यांसारख्या क्षेत्रांमधील क्रांतिकारी उपक्रमांच्या माध्यमातून समृद्ध भारताचा सरकारचा संकल्प साकार होत असल्याचेही पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखीत केले आहे. भारताच्या आर्थिक पायाला बळकटी देण्यासाठी, जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि सर्व नागरिकांचा सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनेच या सुधारणांची आखणी केली गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
advertisement
या संदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश:
भारताची रिफॉर्म एक्सप्रेस वेग जारी राखत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गुंतवणूक विषयक तसेच मागणीवर आधारित व्यापक धोरणांमुळे या सुधारणांना बळ मिळते आहे.
पायाभूत सुविधा असोत, उत्पादन क्षेत्रातील प्रोत्साहन असो, डिजिटल स्वरुपातील सार्वजनिक वस्तुमाल असो अथवा व्यवसाय सुलभता असो, आम्ही समृद्ध भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहोत.
