सीताफळ शेतीचा जालना पॅटर्न, एकरात मिळवलं 1 लाख 28 हजार उत्पन्न
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना जिल्ह्यातील वखारी गावचे रामप्रसाद खैरे यांनी आपल्या 20 एकर क्षेत्रावर सिताफळांची लागवड करून शाश्वत उत्पन्नाचे साधन शोधले. पाहुयात कसा केला त्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन सीताफळ शेतीचा प्रयोग.
advertisement
1/7

आसमानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी नेहमीच पिचला जात आहे. यावर अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने फळबाग शेतीमधून असाच उपाय शोधला आहे.
advertisement
2/7
जालना जिल्ह्यातील वखारी गावचे रामप्रसाद खैरे यांनी आपल्या 20 एकर क्षेत्रावर सिताफळांची लागवड करून शाश्वत उत्पन्नाचे साधन शोधले. पाहुयात कसा केला त्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन सीताफळ शेतीचा प्रयोग.
advertisement
3/7
वखारी येथील प्रयोगशील शेतकरी रामप्रसाद खैरे हे शिक्षक देखील आहेत. नोकरीमधून केवळ रविवारी सुट्टी मिळत असल्याने शेतीला वेळ देणं शक्य नव्हतं. त्यात सोयाबीन, कापूस अशा पारंपारिक पिकांमध्ये सातत्याने लक्ष घालावे लागते. मजुरांची ही मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते.
advertisement
4/7
त्यामुळेच त्यांनी कमी मजुरांची आवश्यकता असणारे आणि जास्त निगराणीची गरज न भासणारे सीताफळ या पिकाची निवड अभ्यासपूर्वक केली. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथील मार्गदर्शनाचा त्यांना या कामी लाभ झाला.
advertisement
5/7
सुरुवातीला 2017 मध्ये बालानगर या वाणापासून त्यांनी दोन एकर शिताफळ लागवडीला सुरुवात केली. हळूहळू हे क्षेत्र वाढवत नेत आता तब्बल एकूण 20 एकर क्षेत्रावर वेगवेगळ्या वाणांच्या सीताफळाची लागवड त्यांनी केली आहे. 2022 पासून त्यांना संपूर्ण 20 एकर सीताफळ बागेतून उत्पन्नाला सुरुवात झाली. 2020 मध्ये 7 लाख 21 हजार रुपयांचा बगीचा त्यांनी व्यापाऱ्याला ठोक दिला.
advertisement
6/7
तर 2023 मध्ये याच बागेमधून 15 लाख 21 हजार उत्पन्न मिळालं. 2024 मध्ये 23 लाख 51 हजार रुपयांना त्यांनी बगीच्या व्यापाऱ्याला ठोक दिला आहे. प्रती एकर 1 लाख 38 हजार रुपये त्यांच्या सिताफळ बागेतून त्यांना उत्पादन होत आहे तर 10 हजार रुपये प्रति एकर खर्च वगळता 1 लाख 28 हजारांचा निव्वळ नफा सिताफळ शेतीमधून रामप्रसाद खैरे कमवत आहेत. केवळ रविवारीच वेळ देऊन त्यांनी हे यश मिळवलं असल्याने ते या शेतीला संडे फार्मिंग संबोधतात.
advertisement
7/7
'माझ्याकडे एकूण चार व्हरायटी आहेत. बालानगर, सरस्वती सेवन, सरस्वती वन आणि गोल्डन अशा प्रकारे चार व्हरायटी माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे पीक एक प्रकारे शेतकऱ्यांना वरदान आहे. याला खर्च कमी आहे जास्त मेहनतीची गरज नाही कमी मजूर लागतात आणि विशेष म्हणजे पाण्याचीही आवश्यकता अत्यल्प असते. सहा महिन्याचे पीक असं मी या पिकाला म्हणतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन सिताफळ शेतीकडे वळावे आणि आपली आर्थिक भरभराट करावी', असे आवाहन रामप्रसाद खैरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.