Women Success Story: नोकरी सोडली, शेतात केले नवनवीन प्रयोग, आता महिलेची लाखात कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
महिला शेतकरी वैजयंती घारपुरे यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून शेतीमध्ये लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. अनेकांच्या मार्गदर्शनातून आज त्या प्रयोगशील शेती करीत आहेत.
advertisement
1/6

नागपूर जिल्ह्यातील सुकळी घारपुरे येथील महिला शेतकरी वैजयंती घारपुरे(गोखले). लहानपणापासून त्यांना वडिलांकडून शेतीचे धडे मिळाले. त्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची नोकरी त्या करीत होत्या. वडिलांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्या आईवर आली.
advertisement
2/6
त्या शेती सांभाळत असताना त्यांना खूप अडचणी येऊ लागल्या. तरीही हार न मानता त्यांच्या आईने शेती सांभाळली. 2018 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर वैजयंती यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून शेतीमध्ये लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. अनेकांच्या मार्गदर्शनातून आज त्या प्रयोगशील शेती करीत आहेत.
advertisement
3/6
प्रगतशील महिला शेतकरी वैजयंती घारपुरे (गोखले) यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, मी लहानपणापासूनच शेतीशी जुळलेली आहे. लहान असताना मी वडिलांसोबत शेतात जायची. शेतीचे साधने बघायची. त्यामुळं शेतीबद्दल माया तर मनातून होती. वडील शेती करीत होते. कालांतराने वडिलांची प्रकृती बिघडली. शेतीचे नियोजन बिघडले. तेव्हा मी नोकरी करून वडिलांना मदत करत होते. दहावीनंतर मी टेक्सटाईल्स विषयात डिप्लोमा केला, असे त्या सांगतात.
advertisement
4/6
पुढे त्या सांगतात की, काही वर्षांनंतर लग्न झाले. लग्नानंतर मी M.A. आणि B.Ed केले आणि शाळेत (Southern Point School, नागपूर) येथे पुन्हा नोकरी करत होते. लग्नानंतर 15 दिवसांनी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईवर सर्व जबाबदारी आली. शेतीची सर्व कामे आई करत होती. माझ्या माहेरी आम्ही चार बहिणीच होतो. मी आईचे कष्ट बघत होती, तिला मदत करत होती. पण, आईला असं वाटत होतं की मी शेतीत येऊ नये. कारण तिने यात खूप चढ-उतार बघितले होते. पण, 2018 मध्ये आईचे निधन झाले आणि मी शेती क्षेत्रात आले.
advertisement
5/6
कालांतराने वेगवेगळ्या शेतकरी संस्थांशी मी जुळत गेले. अंबुजा फाउंडेशन, आत्मा संस्था यासारख्या अनेकांची मला मदत मिळाली. त्यातून खूप फायदा होत गेला. गांडूळखत निर्मिती केली, वेगवेगळी औषधे बनवण्याची संधी मिळाली. त्यातून शेतीला खूप फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांना यातून पाहिजे ती मदत मिळाली.
advertisement
6/6
वडिलांची 10 एकर शेती आणि भाडेतत्त्वावर घेतलेली 5 एकर शेती असे मिळून 15 एकर शेती मी सध्या सांभाळत आहे. यामध्ये कपाशी हे मुख्य पीक आहे. त्याचबरोबर भाजीपाला, सोयाबीन, गहू, चना, तूर असे सर्व पिकं मी घेते. मला कापूस आणि तुरीचे उत्पन्न एकरी 10 ते 15 क्विंटलपर्यंत मिळते. शेतात पिकवलेली तूर मी मार्केटमध्ये विकत नाही तर त्याची डाळ बनवून विकते. त्यामुळे नफा जास्त मिळतो. तसेच भाजीपाला सुद्धा मी स्वतःच विक्री करते. यासर्व शेतातून माझी वार्षिक उलाढाल 13 ते 15 लाखांपर्यंत होते, असं वैजयंती सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Women Success Story: नोकरी सोडली, शेतात केले नवनवीन प्रयोग, आता महिलेची लाखात कमाई