Anurag Kashyap: ब्राम्हणांच्या विरोधात बोलणारा अनुराग कश्यप कोणत्या जातीचा? ज्याने बदललं स्वतःचं आडनाव, यामागचं कारणही सांगितलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Anurag Kashyap: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमीच आपल्या बिनधास्त, बेधडक बोलण्यामुळे चर्चेत असतो. आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमीच आपल्या बिनधास्त, बेधडक बोलण्यामुळे चर्चेत असतो. आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.
advertisement
2/7
अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजावर केलेली टिप्पणी, जी अनेकांना चटका लावणारी ठरली. ज्यामुळे वाद उफळला. शेवटी त्याला माफी मागावी लागली.
advertisement
3/7
अनंत महादेवन यांच्या आगामी चित्रपट 'फुले' वर सेन्सॉर बोर्डाने काही सीन कट करायला सांगितले. यावर अनुराग कश्यप नाराज झाला आणि सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये त्याने ब्राह्मण समाजावर टीका केली. ज्यामुळे वाद उफळला.
advertisement
4/7
विवाद वाढल्यानंतर अनुराग कश्यपने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत "संदर्भाबाहेर घेतलेल्या ओळीबद्दल" माफी मागितली. त्याने लिहिले, “मी माफी मागतो, पोस्टसाठी नव्हे, तर त्या एका ओळीसाठी जी चुकीच्या पद्धतीने पसरवली गेली. कुणाच्याही कुटुंबाला, मित्रांना धमक्या दिल्या जाणं योग्य नाही.”
advertisement
5/7
अनुराग कश्यपच्या विधानावरून मुंबई, इंदूर, जयपूर अशा अनेक ठिकाणी पोलिस तक्रारी दाखल झाल्या आहेत. वाद वाढताच अनुरादने माफी मागितली त्यामुळे पेटलेला वाद निवळला.
advertisement
6/7
ब्राह्मणांच्या विरोधात बोलणारा अनुराग कश्यप कोणत्या धर्माचा हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता होती. अनुरागचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे 10 सप्टेंबर 1972 रोजी एका 'कायस्थ' कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रकाश सिंग हे यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये अभियंता होते.
advertisement
7/7
2018 मध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये अनुरागने सांगितले की, त्याच्या वडिलांनी आणीबाणीच्या काळात ‘सिंग’ हे आडनाव हटवून ‘कश्यप’ आडनाव घेतले. त्यावेळी ‘सिंग’ आडनावामुळे काही अडचणी येत होत्या. अनुरागचं बालपणीचं नाव रिंकू सिंग होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Anurag Kashyap: ब्राम्हणांच्या विरोधात बोलणारा अनुराग कश्यप कोणत्या जातीचा? ज्याने बदललं स्वतःचं आडनाव, यामागचं कारणही सांगितलं