Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच इतकं तापलं, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
सोमवारी मुंबईसह, ठाणे आणि रायगडला उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांना सध्या प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
1/5

राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट हवामान खात्याने दिला होता. सोमवारी मुंबईसह, ठाणे आणि रायगडला उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांना सध्या प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
2/5
कल्याण-डोंबिवलीमध्ये आज 9 मार्च रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
3/5
त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान सर्वाधिक उष्णतेची तीव्रता राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
4/5
दरम्यान, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील ही उष्णतेची लाट मार्च महिन्यातच सुरू झाली आहे. काही ठिकाणी 41-43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले असून, कल्याण-डोंबिवलीतही पुढील काही दिवस तापमान 42 -44 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
5/5
त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे, दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच इतकं तापलं, हवामान विभागाचा अलर्ट