जेवणात मिठाचा करताय जास्त वापर? आताच थांबा सवय, हे आजार नाहीतर सोडणार नाहीत साथ
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मीठ हे जेवणातील मुख्य घटक आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे मिठाचा वापर केला जातो.
advertisement
1/5

मीठ हे जेवणातील मुख्य घटक आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे मिठाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का आहारामधून मीठ कमी केलं तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? मीठ कमी खाल्लेलं चांगलं की वाईट, हेच आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलेलं आहे.
advertisement
2/5
कोणताही पदार्थ चमचमीत करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात मिठाचा वापर केला जातो. प्रत्येक व्यक्तीने दिवसभरामध्ये फक्त पाच ग्रॅम एवढं मीठ खायला पाहिजे म्हणजेच एक चिमूटभर मीठ आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
3/5
पापड, लोणचं किंवा इतरही कोणत्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असतं आणि ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतं. हे शक्यतो आपण खाणं टाळलं पाहिजे. तसेच आपल्यापैकी काही जणांना सवय असते की ज्यांना अगोदर वरून मीठ टाकूनच जेवण करायचं तर ते देखील खूप हानिकारक आहे.
advertisement
4/5
आपण जास्त मीठ आहारामध्ये घेतलं तर उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्यासोबतच हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यासोबतच किडनीवर देखील याचा वाईट परिणाम होतो. असे वाईट परिणाम आपल्यावर होतात. त्यामुळे जेवण करताना तुम्ही कमीत कमी मीठ खाण्याचा प्रयत्न करावा, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
5/5
तसेच जर तुम्हाला खायला चमचमीत लागत असेल तर तुम्ही ताक किंवा लिंबू हे तुमच्या आहारात घेतलं तर नक्कीच याचे चांगले परिणाम तुमच्यावर होतील. त्यामुळे आहारामध्ये कमीत कमी मिठाचा वापर करावा जेणेकरून तुमचं आरोग्य हे चांगलं राहील, असं आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
जेवणात मिठाचा करताय जास्त वापर? आताच थांबा सवय, हे आजार नाहीतर सोडणार नाहीत साथ