Raw Veggie Side Effects : सॅलडमध्ये 'या' भाज्या कच्च्या खाता? वेळीच थांबवा; पचन तर बिघडेलच, मेंदूसाठीही धोकादायक..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Do not eat these vegetables in raw form : हल्ली सॅलड खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. खरं तर आरोग्याच्या दृष्टीने ते खूप गरजेचंही आहे. कारण सॅलडमधून आपल्या शरीराला आवश्यक फायबर मिळते, ज्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते. पण या सॅलडमध्ये तुम्ही काही भाज्या कच्च्या कळल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
advertisement
1/7

सॅलडमध्ये हल्ली बरेच लोक कच्च्या भाज्या खातात. टोमॅटो, काकडी, गाजर किंवा काही पालेभाज्या आपण कच्च्या खाऊ शकतो. सॅलड व्यतिरिक्तही काही भाज्या कच्च्या खाणं आपल्या आरोग्यावर चुकलीच परिणाम करू शकतं. त्यामुळे त्या खाणं टाळावंच. चला पाहूया त्या भाज्या कोणत्या आहेत.
advertisement
2/7
आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांच्यामते, काही भाज्या कधीही कच्च्या खाणं आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण त्यात असलेले बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ कळूप धोकादायक असू शकतात. हे केवळ तुमच्या आरोग्यावरचनाही तर तुमच्या मेंदूलाही हानी पोहोचवू शकतात.
advertisement
3/7
पालक : सर्वात पहिली भाजी आहे ती म्हणजे पालक. पालक बरेच लोक सॅलडमध्ये आणि भजी करण्यासाठीही कच्चाच वापरतात. कच्चा पालक खाल्ल्याने अतिसार आणि गंभीर पोटाचे संक्रमण होऊ शकते. कच्च्या पालकात ऑक्सॅलेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
advertisement
4/7
मात्र डॉक्टरांच्या मते, पालकामध्ये ई. कोलाय आणि टेपवर्म अंडी सारखे धोकादायक बॅक्टेरिया असू शकतात. केवळ पालक धुतल्याने ते निघत नाहीत. त्यामुळे तुम्ही कच्चा पालक धुवून जरी खाल्ला तरी तो घातक ठरू शकतो. म्हणून पालक खाण्यापूर्वी ते नेहमी उकळा किंवा शिजवा.
advertisement
5/7
कोबी : कोबीदेखील कच्चा खाणं टाळावं. बरेच लोक सॅलडमध्ये कच्चा कोबी खातात. मात्र तुम्ही कितीही स्वच्छ पाण्यात किंवा कोणतेही घरगुती उपाय करून कोबी धुता तरी त्यातील टेपवर्म अंडी पूर्णपणे निघत नाहीत. ही अंडी तुमच्या रक्तप्रवाहात गेली तर ती थेट तुमच्या मेंदूत जाऊ शकतात. यामुळे न्यूरोसिस्टिसकोसिस नावाची गंभीर आणि जीवघेणी स्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे झटके देखील येऊ शकतात. म्हणून डॉक्टर सांगतात कोबी नेहमी जास्त उष्णतेवर शिजवून खावी.
advertisement
6/7
वांगी : पालक कोबीप्रमाणे वांगीदेखील कच्ची खाऊ नये. कारण वांग्यात सोलानाइन नावाचे नैसर्गिक विष असते. ते कच्चे खाल्ल्याने मळमळ, उलट्या आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून वांगी नेहमी शिजवून खावी, जेणेकरून हे विष पूर्णपणे नष्ट होईल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Raw Veggie Side Effects : सॅलडमध्ये 'या' भाज्या कच्च्या खाता? वेळीच थांबवा; पचन तर बिघडेलच, मेंदूसाठीही धोकादायक..