राज्यात पाऊस कधी परतणार? वाचा दिलासादायक अपडेट
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ऑगस्टच्या पहिल्याच दोन आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसह सर्वजण पाऊस पुन्हा कधी येणार, या प्रतीक्षेत आहेत.
advertisement
1/5

यंदा मान्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावली. जूनमध्ये कमी पाऊस झाला पण जुलै महिन्यात मात्र पावसाचं प्रमाण वाढलं आणि शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला. ऑगस्टमध्येसुद्धा पावसाचा जोर असाच राहील, अशी अपेक्षा असताना धो धो कोसळणाऱ्या पावसाने अचानक उघडीप घेतली. ऑगस्टच्या पहिल्याच दोन आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आता सर्वजण पाऊस पुन्हा कधी येणार, या प्रतीक्षेत आहेत.
advertisement
2/5
आता याबाबत एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसळीकर यांनी येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलंय, 'महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता.'
advertisement
3/5
होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. शेजारच्या परिसरातदेखील पाऊस पडू शकतो. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, मात्र स्पष्ट नाही, असं होसळीकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
4/5
मागील महिन्यात कोकणात अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. इर्शाळवाडी दुर्घटनेने अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. असा प्रचंड हाहा:कार माजवून कोकणातही पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडलं. परंतु आता मात्र पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटणार आहेत. कोकण विभागात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/5
राज्यातली सद्यस्थिती पाहता काही भागात तुरळक, तर कोकणात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. एकंदरीत काही भागांत अधूनमधून पाऊस पडत असला तरी वातावरण कोरडं आहे.