Mumbai Weather Update: आंबा काजूला धोका, शेतकऱ्यांवर संकट, कोकणात हवामानाने वाढवलं टेन्शन
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Mumbai Weather Update: कोकणातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आजच्या हवामानबदल जाणून घ्या.
advertisement
1/5

नव्या वर्षाची सुरूवात होताच वातावरणात देखील बदल झाले आहेत. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
advertisement
2/5
मात्र मुंबईत हवामानात काहीसा बदल झाला आहे. मुंबईत पहाटे धुक्याची चादर, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळं यामुळे कमाल तापमानात काही अंशांनी वाढ होणार आहे.
advertisement
3/5
मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा थंडी आणि ढगाळ वातावरण आढळून येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबई आणि उपनगरात थंडी कमी होण्यास सुरुवात झाली होती.
advertisement
4/5
सध्या मुंबईची थंडी कमी झाल्यामुळे, आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 55 टक्के असेल.
advertisement
5/5
कोकणात गेले काही दिवस पावसाचे अलर्ट देण्यात येत होते. परंतु सध्या ढगाळ वातावरण जरी असले तरी वातावरणात गारवा जाणवत आहे. मुंबईप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत आहेत. या वातावरण बदलामुळे काजू आणि आंब्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update: आंबा काजूला धोका, शेतकऱ्यांवर संकट, कोकणात हवामानाने वाढवलं टेन्शन