TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, शुक्रवारी 28 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
28 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, शुक्रवारी 28 जिल्ह्यांना अलर्ट
29 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 28 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पाहुयात, 29 ऑगस्ट रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
7/7
29 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच आवश्यक ती काळजी घेणे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, शुक्रवारी 28 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल