TRENDING:

Bhagavad Gita: माणसाला नरकाच्या दाराशी नेणाऱ्या 3 गोष्टी; श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगून ठेवलंय की..

Last Updated:
Bhagavad Gita Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये तीन गोष्टींना नरकाचे द्वार मानले आहे. या तीन गोष्टींमुळे माणूस नेहमी दुःखी राहतो आणि प्रत्येक कार्यात त्याला नैराश्य येते. जर या तीन गोष्टींवर नियंत्रण मिळवले, तर आत्मा पवित्र होतो आणि जीवनात यश आणि खरा आनंद आपोआप मिळतो.
advertisement
1/6
माणसाला नरकाच्या दाराशी नेणाऱ्या 3 गोष्टी; श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगितलंय..
भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेले हे तीन दोष खालीलप्रमाणे आहेत:त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत।।(भगवद्गीता, अध्याय 16, श्लोक 21)
advertisement
2/6
या श्लोकाचा अर्थ असा की: इच्छा (काम), क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत जी आत्म्याचा नाश करतात. म्हणूनच या तीन दोषांचा त्याग केला पाहिजे.
advertisement
3/6
काम (अति इच्छा) -श्रीकृष्णांच्या मते, इच्छा असणे हे जीवनाचा नैसर्गिक भाग आहे, पण जेव्हा त्या अनियंत्रित होतात, तेव्हा त्या माणसाला आंधळे करतात. आजच्या काळात नवनवीन वस्तू, सुखसोयी आणि पैशाची सततची हाव माणसाला वेड लावते. हा हव्यास माणसाची विचार करण्याची शक्ती नष्ट करतो, ज्यामुळे तो योग्य-अयोग्य विसरतो आणि शेवटी त्याचा अधःपतन होते.
advertisement
4/6
क्रोध (राग) -आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणे सर्व सामान्य बाब झाली आहे. भगवान कृष्ण चेतावणी देतात की, क्रोध माणसाची बुद्धी नष्ट करतो. जेव्हा राग अनावर होतो, तेव्हा माणसाची निर्णयक्षमता संपते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय किंवा बोललेले कठोर शब्द वर्षानुवर्षांची मेहनत आणि नाती उद्ध्वस्त करू शकतात. शांती हाच या मानसिक त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.
advertisement
5/6
लोभ - गीतेमध्ये सांगितलेले नरकाचे तिसरे द्वार म्हणजे लोभ. आज समाजात दिसणारा भ्रष्टाचार, फसवणूक आणि नात्यांमधील दुरावा यांचे मुख्य कारण लोभ हेच आहे. लोभी माणसाकडे कितीही संपत्ती असली तरी त्याला ती कमीच वाटते. तो वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही आणि नेहमी अधिक मिळवण्याच्या शर्यतीत धावत राहतो. श्रीकृष्ण म्हणतात की, लोभ ही एक अशी साखळी आहे जी आत्म्याला बांधून ठेवते आणि खरी शांती मिळूच देत नाही.
advertisement
6/6
नरकाच्या या तीन दारांपासून कसे वाचायचे?भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सल्ला दिला होता की, या तीन दोषांचा त्याग केल्याने मनुष्य आपल्या आत्म्याचे कल्याण करतो आणि शेवटी सुख व शांतीचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, नरक हे कोणतेही बाहेरचे ठिकाण नसून ते आपल्या स्वतःच्या नकारात्मक वर्तनातच लपलेले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Bhagavad Gita: माणसाला नरकाच्या दाराशी नेणाऱ्या 3 गोष्टी; श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगून ठेवलंय की..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल