TRENDING:

हातातून 'या' वस्तू पडणं मानलं जात खूपच अशुभ, नेमकं काय घडत?

Last Updated:
अनेकदा घाईघाईत किंवा नकळत आपल्या हातातून काही वस्तू जमिनीवर पडतात. आपण याला सामान्य घटना मानून दुर्लक्ष करतो, परंतु शकुन शास्त्रानुसार हातातून ठराविक वस्तू वारंवार पडणे हे येणाऱ्या संकटाचे किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण असू शकते.
advertisement
1/7
हातातून 'या' वस्तू पडणं मानलं जात खूपच अशुभ, नेमकं काय घडत?
शकुन शास्त्रानुसार आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटना भविष्यातील शुभ-अशुभ संकेतांची माहिती देत असतात. अनेकदा घाईघाईत किंवा नकळत आपल्या हातातून काही वस्तू जमिनीवर पडतात. आपण याला सामान्य घटना मानून दुर्लक्ष करतो, परंतु शकुन शास्त्रानुसार हातातून ठराविक वस्तू वारंवार पडणे हे येणाऱ्या संकटाचे किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण असू शकते.
advertisement
2/7
मीठ पडणे: हातातून मीठ सांडणे हे सर्वात मोठे अशुभ लक्षण मानले जाते. शकुन शास्त्रानुसार, मीठ सांडणे हे कुंडलीतील शुक्र आणि चंद्राच्या कमकुवत स्थितीचे लक्षण आहे. यामुळे घरात दरिद्रता येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण वादविवाद सुरू होतात. पाश्चात्य संस्कृतीतही मीठ सांडणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.
advertisement
3/7
दूध सांडणे: उकळणारे दूध उतू जाणे किंवा हातातील दुधाचा ग्लास जमिनीवर पडणे हे अशुभ मानले जाते. दूध हे चंद्राचे प्रतीक आहे. दूध सांडणे हे घरातील सुख-शांती भंग होण्याचे आणि आर्थिक ओढाताण वाढण्याचे संकेत देते. यामुळे कुटुंबातील कोणाचे तरी आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
advertisement
4/7
तेल पडणे: हातातील तेलाची बाटली किंवा भांडे पडणे हे शकुन शास्त्रानुसार मोठ्या संकटाचे लक्षण आहे. तेल हे शनी देवाचे प्रतीक मानले जाते. वारंवार तेल सांडणे याचा अर्थ असा की शनी देव तुमच्यावर कोपले आहेत. हे घरावरील मोठे आर्थिक संकट किंवा एखाद्या कायदेशीर कटकटीचे संकेत असू शकतात.
advertisement
5/7
अन्न किंवा धान्याची थाळी: जेवताना किंवा वाढताना अन्नाची थाळी हातातून पडणे किंवा अन्न जमिनीवर सांडणे हे माता अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते आणि लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही. अन्नाचा अपमान झाल्यामुळे घरातील बरकत कमी होते.
advertisement
6/7
पूजा किंवा आरतीचे ताट: पूजेच्या वेळी हातातून आरतीचे ताट किंवा दिवा पडणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की देव तुमच्यावर प्रसन्न नाहीत किंवा तुमच्या पूजेत काहीतरी त्रुटी राहिली आहे. हे आगामी काळातील एखाद्या मोठ्या अपयशाचे किंवा अशुभ बातमीचे लक्षण असू शकते.
advertisement
7/7
काच फुटणे किंवा पडणे: हातातून काचेच्या वस्तू पडणे आणि त्या फुटणे हे देखील अशुभ मानले जाते. जरी काही लोक म्हणतात की संकट टळले, तरी शकुन शास्त्रानुसार काच फुटणे हे घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचे आणि नात्यांमध्ये दुरावा येण्याचे लक्षण आहे. यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
हातातून 'या' वस्तू पडणं मानलं जात खूपच अशुभ, नेमकं काय घडत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल